Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

महाराष्ट्रासह दहा राज्यात होणार घरोघरी सर्वेक्षण

schedule09 Jun 20 person by visibility 295 categoryआरोग्य

नवी दिल्ली: देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत; महाराष्ट्रासह १० राज्यात करोनाचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे. दहा राज्यातील ३८ जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. यामुळे संसर्ग आणि मृत्यू दर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास मोदी सरकारला आहे.

आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध ४५ महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत प्रीती सुदान यांनी सांगितले की, ‘लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह १० राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करावे. कंटेन्मेंट झोनमध्ये केसेचे व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला यावेळी राज्यांना देण्यात आला.  महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या १० राज्यातील ३८ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id